एकदा मालुक्यपुत्राने बुद्धांना विचारले, “प्रभु, तुम्ही आजपर्यंत सांगितले नाही की मृत्यूनंतर काय होते?
त्याचे ऐकून बुद्ध हसले आणि म्हणाले..
आधी माझ्या एका गोष्टीचे उत्तर द्या...
जर एखादी व्यक्ती कुठेतरी जात असताना अचानक विषारी बाण कुठूनतरी त्याच्या शरीरात घुसला असेल तर त्या व्यक्तीने किंवा मदत करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने काय करावे?
आधी शरीरात घुसलेला बाण काढून टाकावा कि बाण कोठून आला, कोणी मारला आणि कोणाला उद्देशून मारला हे पहावे?
आधी शरीरात गेलेला बाण ताबडतोब काढला पाहिजे, अन्यथा विष संपूर्ण शरीरात पसरेल.
बुद्ध म्हणाले, “तुम्ही अगदी बरोबर आहात,
पहा आपल्या जीवनात दुःख हे विषारी बाणाप्रमाणे आहे,
आता मला सांगा की या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी उपाय करायचे की मृत्यूच्या नंतरच्या गोष्टींचा विचार करायचा.”
बुध्दांचे उत्तर ऐकून मालुक्यपुत्र समजला होता आणि मग त्याची उत्सुकता दूर झाली.
Tags:
गौतम बुद्धांच्या लघुकथा